कोर्लई, ता.१६(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील मजगांव आगरआळी येथे सप्तरंगी मित्र मंडळातर्फे साखरचौथ गणपती ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीमुर्ती पूजेचा बहुमान रविंद्र बैकर व त्यांच्या सौभाग्यवती सौ.दिपाली यांना तर आरतीचा मान अनिल बाळकृष्ण पाटील यांना मिळाला.
मजगांव आगरआळीतील सप्तरंगी मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून साखरचौथ गणपती स्थापनेचे यंदा दहावे वर्ष होते.
मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी गणपती मिरवणूकीचे आगमन झाले.दुस-या दिवशी बुधवार दि.१० सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ८.३० वा.रविंद्र बैकर व सौ.दिपाली बैकर यांच्या हस्ते श्री मुर्तीची विधिवत पूजा अर्चा करून प्राण प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली.
यादिवशी रात्री ९.१५ मि. श्री.अनिल पाटील सौ.रेणुका पाटील यांच्या हस्ते आरती झाल्यावर भजन रात्री १०.०० वा. मोरे येथील जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ सुप्रसिद्ध भजनकार रायगड भूषण बुवा संतोष शीतकर व गोरक्ष कुमरोटकर यांचे शिष्य बुवा उद्देश कासारे यांचे सुश्राव्य बहारदार भजनाचा भाविकांनी आनंद लुटला ! त्यांना पखवाज रमेश दिवेकर तर तबला साथ उदय गाणार यांनी दिली.गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वा. अजित आयरकर व सौ.शिल्पा अजित आयरकर यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. दुपारी १२.०० वा. बुवा अजित आयरकर व बुवा रमाकांत गिरणेकर सुश्राव्य भजन झाले.सायंकाळी ४.०० वा.दर्शन मिठाग्री व सौ.अमिता दर्शन मिठाग्री यांच्याहस्ते उत्तर पूजा आरती घेण्यात येऊन सायंकाळी श्री मुर्तीची गावातून वाजत गाजत बेंजो च्या तालात मिरवणूक काढण्यात येऊन सांगता करण्यात आली.
सप्तरंगी मित्र मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ ढमाले, उपाध्यक्ष दिपक गवंडी, सचिव अतिश जगदीश आयरकर, सहसचिव रविंद्र बैकर, खजिनदार महेश पाटील, उपखजिनदार सागर पाके व सल्लागार प्रशांत मिठाग्री, अनिल पाटील,राजेंद्र पाटील व सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या