Type Here to Get Search Results !

मुरुड - भोगेश्वर पाखाडी येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर अल्पसंख्याक मुलांनी केली दगडफेक * नागरिकांची पोलिस ठाण्यात धाव



    
कोर्लई,ता.१३(राजीव नेवासेकर)मुरुडमध्ये काल पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात भोगेश्वर पाखाडीतून ६० जणांची एकत्रित गौरी गणपती विसर्जन मिरवणूक जात असताना जगदीश पाटील यांच्या घराजवळ आली असता अचानक या विसर्जन मिरवणूकीवर सायंकाळी ७ च्या दरम्यान ८ वर्षाच्या आतील दोन अल्पसंख्याक मुलांनी दगडफेक केली त्यामुळे या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला होता. 
आज सकाळी ११ च्या दरम्यान शहरातील हिंदु समाजांनी मुरुड पोलिस ठाण्याला घेराव घालून दोन्ही मुलांना व पालकांना अटक करण्याची मागणी केली. 
    सविस्तर असे आहे की काल सायंकाळच्या दरम्यान भोगेश्वर पाखाडीत घरघोती गणपती मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत येत असताना ही मिरवणूक जगदीश पाटील यांच्या निवासस्थानी जवळील रस्तावर आली असता ददनाक कंपाऊंड मधुन मिरवणूक मध्ये असणाऱ्या गणेशभक्त महिला प्रिता चौलकर यांच्या बाजूने एक दगड आला तद्नंतर दुसरा दगड वैशाली म्हात्रे यांच्या जोरदार हाताला लागला सतत दगड आल्याने गणेश भक्तांनी दगड येणाऱ्या कंपाऊंड मध्ये गेट उघडून घुसण्याचा प्रयत्न केला परंतू गेटला आतून कडी असल्याने आळीतील मुलांनी कपाऊंड वर चढून गेले असता दोन लहान मुले जाणून बुजून दगडे मारीत असल्याचे निदर्शनास आले.आम्हाला पाहुन ती दोन लहान मुले पळून गेली.परंतु या दगड फेकीत महिला जखमी झाल्या त्यांना मुका मार लागला आहे ही बातमी मिळताच तात्काळ मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे व कर्मचारी घटनास्थळी येऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.रात्रभर चर्चा करण्यात आली सकाळी येणेचे आवाहन मुरुड पोलिस ठाण्या मार्फत करण्यात आले होते.परंतु पोलिसांकडून सकाळ पर्यंत दोन्ही मुलांवर व पालकांवर यांच्या मागे त्यांस प्रोत्साहन करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने सकाळच्या दरम्यान शेकडो हिंदू नागरिकांनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना घेराव घालून जाब विचारला दोन्ही मुलांना, पालकांना व मौलाना अटक आजुन पर्यत का झाली नाही.तात्काळ अटक करा अशि मागणी केली.परंतु तीन तास होऊन गेले तरी कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांकडुन तीव्र नाराजी व्यक्त केली.
जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करु असे आवाहन यावेळी नागरिकांकडून करण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया,भारत माता की जय,जय श्रीराम च्या घोषणांनी पोलिस ठाण्याचि परिसर दणाणून गेला.
यावेळी अलिबाग विभागीय  पोलिस अधिकारी - विनित चौधरी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मुलांना पालकांना व मौलल्वी यांना अटक करा अशा घोषणा नागरिकांकडुन सारख्या सारख्या येत असल्याने परिसर पुन्हा दुमदुमून गेला.
अखेर पोलिसांनी तक्रार नोंद घेण्यास सुरुवात केली.तद्नंतर नागरिकांनी शांत राहिले आहे.तक्रार घेण्याची प्रोसेस सुरू आहे.मुरुड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.घरातुन आवश्वक असेल तर बाहेर पडा असे आवाहन पोलिसां कडुन करण्यात आले.या घटनेने मुरुड शहरातील व्यापारी वर्गानी दुकाने बंद करण्यात आली.
मुरूड शहरातील मशिदी जवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर