कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तळा शाखेतर्फे ऑनलाईन कविसंमेलन
जुलै २०, २०२४
0
कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)कोकण मराठी साहित्य परिषदेच्या तळा शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन कवी संमेलन संपन्न झाले. प्रास्ताविकात कोमसाप तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले व आपल्या मनोगतात ते म्हणाले की, "आज असंख्य वारकरी पंढपुरात विठुनामाच्या निनादात पांडुरंगाचरणी लीन होताना आपणही कवितेच्या माध्यमातून भक्तीचा जागर करत असून आपल्या शब्दलहरी नक्कीच पांडुरंगापर्यंत पोहचतील व त्याचा कृपाशीर्वाद आपल्या सर्वांसोबत सदैव राहील.असा विश्वास व्यक्त केला".या कविसंमेलनात पंढरीची वारी,माझा देव व विठ्ठल भक्ती या विषयावर २१ कवींनी आपल्या स्वरचित उत्तम रचना सादर केल्या.अध्यक्षीय भाषणात रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील यांनी सांगितले कि,"जरी आज आपण प्रत्यक्ष वारीत सहभागी नसलो तरी आपल्या भक्तीमय रचनांनी आपण सर्वांनी पांडुरंगाला आळवून त्याच्यापर्यंत पोहचलो आहोत.यावेळी त्यांनी आपली कविताही सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कवी संमेलनात नारायण पानावकर,किरण केळुसकर,शिल्पा मोहिते, मंदाकिनी हांडे,प्रतीक्षा नगरकर,रघुनाथ पोवार,उषा खोत,संजय होळकर ,नैनिता कर्णिक,प्रज्ञा मराठे,सिद्धेश लखमदे,अनिता कांबळे,सत्यवान घाडी,प्रज्ञा म्हात्रे,संजना जुवाटकर, अजित शेडगे,संगीता नाचपल्ले यांनी कवितांच्या माध्यमातून विठुरायाच्या नामाचा गजर केला. या कवी संमेलनाचे आभार प्रणय इंगळे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या