यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची बांदिवडेकर ,सहा.शिक्षिका सुजाता पाटील,योगिता गवळे,जसवीर पनेकर आदी.व्यासपिठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्याध्यापिका प्राची बांदिवडेकर यांनी प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यानंतर शाळेतील मुलांना घराशेजारी अथवा घरात आग लागली,कोठे गल्लीत किंवा खेळाच्या मैदानात भांडण होत असेल व महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस 112क्रमांक ,बाळंतपणा साठी 102क्रमांक ,अपघात झाल्यास 108 क्रमांकावर संपर्क साधून मदत घ्यावी, घरातील गॅस सिलेंडर विजेवर चालणारे साहित्याची काळजी,आजी,आजोबाच्या औषधाच्या गोळ्या देताना घ्यावयाची काळजी,त्यात बदल केला तर येणारी आपत्ती याची माहिती,आपणास शिक्षण घेऊन मोठेपणी कोण व्हायचे आहे,आता पासुन ठरवावे.यावेळेस बस व टेम्पो रिक्षातून शाळेत कसे सुरक्षित यायचे यासाठी मावशी कविता गुरव,लेखनिक मैत्री म्हात्रे, शिपाई उज्वल घरत यांचे सहाय्य घेऊन व पालकांसमोर प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आले.यावेळेस 191 विद्यार्थी, 7 शिक्षक,2कर्मचारी उपस्थित होते. सहशिक्षिका अपर्णा गायकवाड यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या